घरCORONA UPDATECoronavirus : लॉकडाऊन नंतरही सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार?

Coronavirus : लॉकडाऊन नंतरही सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार?

Subscribe

१४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन ठेवायचा की आणखी वाढवायचा याबाबत सध्या केंद्र सरकार विचार करत आहे.

राज्यासह देशात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असून, १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन ठेवायचा की आणखी वाढवायचा याबाबत सध्या केंद्र सरकार विचार करत आहे. यासाठी सर्व राज्यातील प्रमुख विरोधीपक्ष नेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनद्वारे संवाद साधला आहे. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जरी लॉकडाऊन १४ तारखेला संपला तरी देशातील सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे देशातील महत्वाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आणि त्यानंतर देशातल्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला या सूचना देण्यात आल्या आहेत.

म्हणून जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद राहणार

देशात लॉकडाऊन असताना देखील कोरोना रुग्णाची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे देश तिसऱ्या स्टेजमध्ये जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, प्रत्येक जिल्हा पातळींवर हायड्रोक्सोक्लरोक्वीनच्या दहा हजार गोळ्या आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी देशातील महत्वाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे चर्चा केली. यात लॉकडाऊननंतर देशातल्या सर्व जिल्ह्यांच्या सीमा दोन आठवडे सीलच ठेवण्याचा विचार झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच या संदर्भात सर्व प्रशासकीय यंत्रणेला या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -