अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.
- समोसेकरीत असताना बाटाट्याच्या मिश्रणात थोडेसे चण्याचे पीठ भाजून घातल्यास समोसे अधिक चवदार होतात.
- टोमॅटो जास्त पिकले असतील किंवा कापता कठीण जात असेल, तर टोमॅटो थोडावेळ बर्फाच्या पाण्यात टाका, टोमॅटो आपोआप कडक होईल.
- पदार्थ तळताना तेलास फेस आल्यास त्यात दोन आमसूल किंवा चिमूटभर मीठ घालावे.
- लोणी कढवताना त्यात दोन विड्याची पाने आणि अर्धा चमचा मीठ टाकावे म्हणजे तुपाला दुर्गंधी येत नाही.
- अळूची वडी करताना त्यात चिंच टाकावी म्हणजे खाताना घशाला खाज येत नाही.
- पाण्याची टाकी शेवाळली असल्यास त्यावर चुना टाका आणि नारळाच्या ब्रशने साफ करावे.
- केक बनवताना अंड्याच्या ऐवजी पिकलेली केळी किंवा दह्यामध्ये थोडी साखर आणि थोडे मीठ घालून वापरु शकता.
- श्रीखंड फसफसू नये, म्हणून चक्का फेटावा आणि साखर भिजेल इतके दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेटलेला चक्का चांगला मिक्स करुन घ्यावा.
- आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा, यामुळे आंबटपणा निघून जातो.
- गुलाबजाम चांगले होण्यासाठी खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळले तर पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम चांगले हलके होतात.