घरताज्या घडामोडीठाकरे सरकार खंडणी गोळा करणारे सरकार; गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!

ठाकरे सरकार खंडणी गोळा करणारे सरकार; गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!

Subscribe

प्रवीण दरेकर यांनी ही मागणी केली आहे.     

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र खळबळजनक असून पोलीस दलात सुरू असलेल्या घटना या पत्राद्वारे महाराष्ट्राच्या जनतेला कळत आहेत. ते स्वत: पोलीस दलातील अधिकारी असून त्यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची अब्रू वेशीला टांगली गेली असून स्वतःच संशयाच्या फेऱ्यात आलेल्या अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केलेल्या दाव्यानुसार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्यापोटी १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते. यावर स्पष्टीकरण देताना अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, असे असले तरी परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर लावलेले आरोप अत्यंत गंभीर असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, असे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या पोलीस विभागातील धक्कादायक प्रकरणे उघडकीस येत आहेत. पोलीस दलाचे खच्चीकरण होताना दिसत आहे. महाराष्ट्र पोलिसांत अशाप्रकारची अराजकता यापूर्वी कधीच नव्हती. परमबीर सिंहांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, असे दरेकर म्हणाले. राज्य सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ चौकशी करावी. तसेच अनिल देशमुख यांनी वाझेंना वसुलीचे काम दिले होते का? याचा खुलासा महाविकास आघाडी सरकारने करावा, अशीही मागणी दरेकर यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -