राज्यात २,६९२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,५९,३४९ तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३५,८८८ वर पोहोचली आहे.
राज्यात आज ४१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची संख्या १,३९,२०७ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात २,७१६ रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत एकूण ६३,८०,६७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२८ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,९२,२२,२६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,५९,३४९ (११.०८टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४३,१५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,३८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.