- Advertisement -
कंगना रनौतने आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलयं. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक लेख शेअर केला आहे. या पोस्टच्या हेडलाईनमध्ये लिहिलेय की, एकतर तुम्ही गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक…. तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. यावर तुम्हीच ठरवा. तिने पुढे असेही लिहिले की, दुसरा गाल दिल्याने भीक मिळते, स्वातंत्र्य नाही. मात्र कंगनाच्या सततच्या वादग्रस्त विधानांमुळे आता राजकीय वातावरण आणखी तापतेय.दरम्यान ,राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी कंगना लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे असं वक्तव्य केलं आहे.
- Advertisement -