साउथ चित्रपटसृष्टीची सुप्रसिद्ध अभिनेत्री सई पल्लवी तिच्या बेधडक अंदाजामुळे आणि सुंदर अभिनयामुळे ओळखली जाते. सध्या सई पल्लवी तिच्या आगामी ‘विराट पर्वम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या सई पल्लवी तिच्या ‘विराट पर्वम’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. नुकत्याच या चित्रपटाच्या एका इवेंट दरम्यान सई पल्लवीने काश्मीरी पंडितांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, ज्यानंतर आता सोशल मीडियावर नव्या वादाची ठिणगी पेटली आहे.
सई पल्लवीच्या वक्तव्यावर वाद
सई पल्लवीने आपल्या नुकत्याच एका इंटरव्यूमध्ये बॉलिवूडमधील ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटात काश्मीरी पंडितांवर दाखवलेला अत्याचार आणि हत्येची तुलना मॉब लिचिंगसोबत केली आहे. सई पल्लवीच्या या विधानावरून सोशल मीडियवर आता नवा वाद सुरू झालेला आहे. सई पल्लवीच्या विधानाचे काही जण समर्थन करत आहेत तर, काही जण तिच्या वक्तव्याचा विरोध करत आहेत.
“For me violence is wrong form of communication. Mine is a neutral family where they only taught to be a good human being. The oppress, however, should be protected. I don’t know who’s right & who’s wrong. If you are a good human being, you don’t feel one is right.”
– #SaiPallavi pic.twitter.com/o6eOuKvd2G— Hate Detector 🔍 (@HateDetectors) June 14, 2022
एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सई पल्लवी म्हणाली की, मी एका चांगल्या वातावरणामध्ये मोठी झाले आहे. मी लेफ्ट विंग आणि राइट विंगबद्दल ऐकलं आहे. मात्र मी हे नाही सांगू शकत की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं.
Every god damn time “Jai Shree Ram” has to be dragged by people like #SaiPallavi. pic.twitter.com/nHSf1qYzyd
— Tushar Kant Naik ॐ♫₹ (@Tushar_KN) June 14, 2022
सई पल्लवी पुढे म्हणाली की, द काश्मीर फाइल्स चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं की कशा प्रकारे काश्मीरी पंडितांची हत्या करण्यात आली आहे. तसेच काही काळापूर्वी गाय घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम माणसाला अत्यंत विकृत पद्धतीने मारून जबरदस्तीने त्याच्या तोंडून जय श्री राम ही घोषणा करण्यास सांगितली. मग ही सुद्धा धर्माच्या नावावर एक प्रकारची हिंसाच आहे. मग या दोन्ही घटनांमध्ये काय फरक आहे?
Best part in #SaiPallavi ‘s statement that she agreed that they were
‘Cow Smugglers’Will tomorrow India will accept if someone starts smuggling your pets like dogs & cats from your houses?
Why steal someone’s cow? It should be dealt with strict punishments.
Chors!
— AParajit Bharat 😌🇮🇳 (@AparBharat) June 14, 2022
या इंटरव्यूमध्ये सई पल्लवीने सांगितले की, तिच्या कुटुंबातून तिला एक चांगला माणूस बनण्याची शिकवन दिली आहे. तसेच मी नेहमी तटस्थ राहणं पसंत करते आणि पीडितांसाठी उभं राहण्याचा प्रयत्न करते. सध्या सई पल्लवीचा हा इंटरव्यू खूप व्हायरल होत असून सई पल्लवीच्या विधानाचे काही जण समर्थन करत आहेत तर, काही जण तिच्या वक्तव्याचा विरोध करत आहेत.