- Advertisement -
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधताना एक सूचक विधान केलं, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात. येत्या २ महिन्यांमध्ये राज्यात काय होणार याचा कोणी अंदाज बांधलाय का, असे दानवे म्हणाल्यामुळे हे मध्यावधी निवडणुकीचे संकेत आहेत का? अशी शंका निर्माण झाली आहे. तर १०० टक्के राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. यामुळे हे सरकार पडणार की वेगळं काही घडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- Advertisement -