- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरबाजीची चर्चा राज्यभरात आणि राजकीय वर्तुळात होताना पाहायला मिळत आहे. बॅनरबाजीमुळे महाविकास आघाडीबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. आधी अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा आणि आता जयंत पाटील यांचे बॅनर्स लागल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न पडतो.
- Advertisement -