घरताज्या घडामोडीजिल्हाधिकारी निधी चौधरींच्या आदेशाने अनाथ आदिवासी बालकांना मिळाला अधिकृत आश्रय

जिल्हाधिकारी निधी चौधरींच्या आदेशाने अनाथ आदिवासी बालकांना मिळाला अधिकृत आश्रय

Subscribe

शाळेच्या ओटीवर झोपून रात्र घालवणार्‍या या मुलांचे आता पूनर्वसनही होणार आहे.

पूरपरिस्थितीत गळक्या घरात दिवस कंठणार्‍या पनवेल आपट्याच्या आदिवासी बाघाचीवाडीवरील तीन अनाथ बालकांना रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या संवेदनशीलतेने अधिकृत आसरा मिळाला आहे. नऊ आणि सात वर्षांची बहीण-भावाच्या चेहर्‍यावर त्यांना मिळालेल्या आसर्‍याने तेज आले. वडीलांचे अकाली हरवलेले छत्र आणि बेपत्ता झालेल्या आईच्या पारखेपणामुळे ६८ वर्षांची आजी त्यांचे संगोपन करत होती. गळक्या झोपडीत झोपणेही त्यांच्यासाठी अडचण बनले होते. शाळेच्या ओटीवर झोपून रात्र घालवणार्‍या या मुलांचे आता पूनर्वसनही होणार आहे.

जिल्हाधिकारी पनवेलच्या दौर्‍यात असताना त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे समाजकार्य अभ्यासक्रमाचे विद्यार्थी दत्ता शिरसाट व त्यांच्या सहकार्‍यांकडून आपटे येथील या आदिवासी पाडयावरील एका कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीची माहिती मिळाली होती. या कुटुंबातील दोन लहान भावंडे, नऊ वर्षांची एक मुलगी आणि सात वर्षीय मुलगा अनाथ असून त्यांना राहायला निवारा नाही. त्यांचे वडील हयात नसून आई बेपत्ता आहे. ते त्यांच्या ६८ वर्षाच्या आजीबरोबरच कसाबसा उदरनिर्वाह करून लहानशा घरात राहतात. हे घरही मोडकळीला आले असून, राहण्यायोग्य नाही. हे कुटूंब घरात पावसाचे पाणी गळत असल्याने शाळेच्या वर्‍हांड्यात झोपत असल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पनवेल तहसिलदार विजय तळेकर आणि महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा परिविक्षा अधिकारी अशोक पाटील यांना तात्काळ त्या कुटुंबाचे व मुलांचे योग्य पुर्नवसन करण्याचे निर्देश दिले.

- Advertisement -

गुरुवारी (५ ऑगस्ट) पनवेल तहसिलदार तळेकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी अशोक पाटील आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता सपकाळ यांनी बाघाची वाडी या आदिवासी पाडयावर भेट देऊन कुटुंबाच्या घराची पाहणी केली. तहसिलदार तळेकर यांनी कुटुंबाच्या पुर्नवसनाबाबत संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या व महिला व बाल विकास विभागाने मुलांना ताब्यात घेऊन त्यांना एस.ओ.एस. बालग्राम, सोगाव येथे बाल कल्याण समिती रायगड यांच्याकडे दाखल केले. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची संवेदनशीलता तसेच संबंधित विभागाने तत्परतेने केलेली कार्यवाही यामुळे दोन अनाथ बालकांना हक्काचे घर मिळाले. यामुळे कुटुंबाच्या घराचा प्रश्न शासनाच्या योजनेतून सुटणार तर आहेच परंतु त्याचबरोबर या अनाथ बालकांच्या शिक्षण, संगोपन व आरोग्य पुर्नवसनाचा प्रश्नही महिला व बाल विकास विभागामार्फत मार्गी लागणार आहे.


हेही वाचा – भारतात लवकरच मिळणार ‘सिंगल डोस’ कोरोना लस, जॉनसन अँड जॉनसनने केला अर्ज

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -