घरताज्या घडामोडीदिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा विचार!

दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा विचार!

Subscribe

अनलॉकच्या प्रक्रियेअंतर्गत अनेक मॉल, जीम, सरकारी आस्थापने इतकेच काय पण मुंबई लोकलही हळूहळू सर्वांसाठी खुली होत असताना शाळा कधी सुरू होणार, असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत कधी नव्हे इतकी मोठी सुट्टी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. दोन-अडिच तासांचा ऑनलाईन क्लास वगळता शाळकरी मुले सुट्टीचा आनंद घेत आहेत. मात्र हा आनंद फार काळ टिकणार नाही. दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू करण्याचा विचार आहे, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याबाबत आधी विचार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

टीव्ही-९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लॉकडाऊन सुरू केल्यापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शालेय शिक्षणाचे वर्ष १५ जूनला ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले. मात्र, शाळा सुरू झाल्या नाहीत. आता दिवाळीनंतर शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याचा विचार आहे, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. तसेच ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बैठक घेणार आहेत. या बैठकीत विद्यार्थी हिताचा निर्णय होईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणाचा मुद्दा न्याय प्रविष्ट आहे. तरीही ११ वीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालये सुरू होण्यास थोडा वेळ लागतो आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेणार असून ते विद्यार्थी हिताचा निर्णय घेतील, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -