घरताज्या घडामोडीपत्रीपूलाचे गर्डर हैद्राबादहून अखेर कल्याणामध्ये दाखल

पत्रीपूलाचे गर्डर हैद्राबादहून अखेर कल्याणामध्ये दाखल

Subscribe

वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला कल्याण पत्रीपूलाच्या कासवगती कारभारामुळे वाहनचालक व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र मार्च अखेरपर्यंत पूत्रीपूलावरील वाहतूक सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला कल्याण पत्रीपूलाच्या कासवगती कारभारामुळे वाहनचालक व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पत्रीपूलाच्या पूर्व व पश्चिमेला जोडणारा सात गर्डर अखेर सोमवारी हैद्राबादहून कल्याणात दाखल झाले. त्यामुळे पत्रीपूलाच्या कामाला चांगलाच जोर लागल्याचे दिसून येत आहे. मार्च अखेरपर्यंत पूत्रीपूलावरील वाहतूक सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शंभर वर्षे जुना लोखंडी पत्रीपूल

कल्याण रेल्वे मार्गावरील ब्रिटीशकालीन जुना लोखंडी पत्रीपूलाला शंभर वर्षे झाल्याने व वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने गेल्या दिड वर्षांपूर्वी पाडण्यात आला आहे. मात्र सुरुवातीला अत्यंत धिम्या गतीने होत असणाऱ्या कामांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. याचा फटका स्थानिक नागरिक व्यापाऱ्यांबरोबरच दररोज याठिकाणहून ये-जा करणाऱ्या हजारो वाहनांनाही बसतोय. कल्याणचा पत्रीपूल हा कल्याण डोंबिवली शहरांना जोडणारा असला तरी सुध्दा भिवंडी कल्याण शीळ हा रस्ता प्रामुखयाने कल्याणच्या पत्रीपुलावरून जातो. त्यानंतर हा रस्ता पुढे नवी मंबई तळोजा पनवेल मुंबई आणि नाशिक महामार्गाला जोडला जातेा. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असते. पत्रीपूलाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने त्या विरोधात राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी अनेकवेळा आंदोलन व मेार्चे काढून प्रशासनाचा निषेध केला. कल्याणच्या एका तरूणाने पत्रीपूलावर भन्नाट रॅप साँग बनवून या रॅपच्या माध्यमातून सरकारवर टीका केली होती. या पुलाचे गर्डर हैद्राबाद येथे बनवण्यात येत होते.

- Advertisement -

मार्च २०२० अखेर पर्यंत पत्रीपूल वाहतूकीसाठी खुला

दरम्यान हा नविन पूल होण्याच्या कामासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महत्वपूर्ण आणि सातत्याने पाठपुरावा केला होता. काही आठवड्यांपूर्वी खासदार शिंदे यांनी स्वतः हैद्राबाद येथे जाऊन या गर्डरच्या कामाची पाहणीही केली होती. अखेर हे गर्डर हैद्राबादहून कल्याणात दाखल झाले आहेत. मात्र हे गर्डर टाकण्यासाठी मेगाब्लॉक घ्यावा लागणार आहे त्यामुळे रेल्वेकडून कल्याण डोंबिवली रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेऊन गर्डर टाकण्याचे काम करण्यात येईल त्यानंतर पत्रीपूल वाहतूकीस खुला होईल. मार्च २०२० अखेर पर्यंत वाहतूकीसाठी खुला करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. पत्रीपूलावरील वाहतूक सुरू झाल्यानंतर वाहनचालकांना खूपच दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -