घरदेश-विदेश'तळीरामां'च्या संख्येत होतेय लक्षणीय वाढ; जागतिक अहवालातून निष्कर्ष

‘तळीरामां’च्या संख्येत होतेय लक्षणीय वाढ; जागतिक अहवालातून निष्कर्ष

Subscribe

दारु पिणाऱ्यांना फक्त निमित्त पुरेसं असतं... हे म्हणणे काही चुकीचे नाही. कारण देशात दिवसेंदिवस दारु पिण्याच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

दारु पिणाऱ्यांना फक्त निमित्त पुरेसं असतं… हे म्हणणे काही चुकीचे नाही. कारण देशात दिवसेंदिवस दारु पिण्याच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. भारतात मद्यपानाच्या प्रमाणात १९९०-२०१७ या १७ वर्षांच्या कालावधीत ३८ % वाढ झाली आहे. १९९० मध्ये एक माणूस वर्षाला सरासरी ४.३ लीटर मद्याचे सेवन करत होता. तर २०१७ मध्ये हाच आकडा ५.९ लीटरवर पोहोचला आहे. यासंदर्भातील एक अहवाल जगप्रसिद्ध ‘लान्सेट’ मासिकात प्रसिद्ध झाला आहे.

गेल्या १७ वर्षात लक्षणीय वाढ

जागतिक आरोग्य संघटनेने जगातील मद्यपानाचे प्रमाण २०२५ पर्यंत १० टक्क्यांनी कमी करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे. पण लक्ष्य गाठण्याची चिन्हं मात्र धुसर झाली आहेत. गेल्या १७ वर्षांत मद्यपानाच्या प्रमाणात जागतिक स्तरावर लक्षणीय वाढ झाली आहे. १९९० मध्ये वर्षाला ५.९ लीटर मद्याचे सेवन वर्षाला केलं जातं होतं. आता मात्र हा आकडा ६.५ लीटरवर पोहोचला आहे. १९९० पर्यंत जगातील उच्च उत्पन्न गटात मोडणाऱ्या देशांमध्ये मद्यापान प्रमाण अधिक होते. आता मात्र भारतासारख्या मध्य उत्पन्न गटात मोडणाऱ्या तर व्हिएतनामसारख्या कमी उत्पन्न गटात मोडणाऱ्या देशांमध्येही मद्यपानाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उच्च उत्पन्न गटात मोडणाऱ्या युरोपातील देशांमध्ये मद्यपानाचे प्रमाण एक तर कमी झालं आहे किंवा स्थिर राहिलं आहे. पण मध्य उत्पन्न गटांच्या देशांमध्ये मात्र या प्रमाणात अधिक वाढ झाली आहे. या अहवालानुसार २०३० पर्यंत जगातील ५० टक्के जनता मद्याचे सेवन करत असेल. मद्यपान हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. तेव्हा हे प्रमाण कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना जगभर अनेक उपक्रम राबवत आहे. पण हे उपक्रम निष्फळ ठरत असल्याचं या अहवालामुळे स्पष्ट झालं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -