भाजप २०१९ सालची निवडणूक जिंकेलच त्याशिवाय पुढची ५० वर्षे भाजप भारतावर सत्ता गाजवेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. दिल्ली येथे भाजप पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु असून आज शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भाषणे झाली. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत या बैठकीतले मुद्दे सांगितले. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे ‘अजेय भारत, अटल भाजपा’ अशी नवी घोषणा भाजपने दिली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, “अटलजींनी भाजपला विचार, संस्कार आणि नेतृत्वाला एक नव्या उंचीवर नेऊन ठेवले. आज आपला सुर्य जरी आपल्यात नसला तरी आपण तारे बनून विचारधारेचा प्रकाश पुढे नेऊया.”
BJP National Executive meet saw extensive discussions on many subjects. Party colleagues expressed their insightful views.
Our Party is humbled by the strong support across India. In the spirit of ‘Ajay Bharat, Atal Bhajpa’ we will continue working tirelessly for India’s growth. pic.twitter.com/aWsNxkQwaM— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2018
भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, विरोधक कितीही आरोप करत असले तरी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या वाटेवर चालत रहायचे आहे. अजय भारत, अटल भारत या नव्या घोषवाक्याने मागच्यावेळेपेक्षाही मोठा विजय आपल्याला मिळवायचा आहे.
विपक्ष भाजपा के खिलाफ चाहे कितना भी दुष्प्रचार करे लेकिन हम श्री @narendramodi जी के नेतृत्व में विकास के मार्ग पर अनवरत चलते रहेंगे और विकास के प्रति हमारा संकल्प और दृढ़ होगा।
अजय भारत – अटल भाजपा के मंत्र के साथ 2019 में पिछली बार से भी अधिक बहुमत के साथ जीत हासिल करेंगे। pic.twitter.com/iDggPIwnrd
— Amit Shah (@AmitShah) September 9, 2018
केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाआघाडीचे वर्णन तीन शब्दात केले आहे. “नेतृत्वाचा पत्ता नाही, नीती नाही आणि नियत भ्रष्ट” काँग्रेस कर्नाटक निवडणुकीनंतर देशात महाआघाडी स्थापन्यासाठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदींनी महाआघाडीवर टीका करुन त्यातील हवा काढून टाकण्याचा प्रयत्न केला.
PM Modi used three powerful words to describe Mahagathbandhan; netritva ka pata nahi, neeti aspashth, neeyat brasht: Union Minister Ravi Shankar Prasad after BJP's national executive meeting. #Delhi pic.twitter.com/JKM3DAzYpI
— ANI (@ANI) September 9, 2018