झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. भारतीय जनता पक्षाने अजून एक राज्य गमावले आहे. विधानसभेच्या ८१ जागा असलेल्या झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि लालू यादव यांचा राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्ष या आघाडीला ४८ जागा मिळत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. झारखंडमध्ये बहुमतासाठी ४१ जागा आवश्यक आहेत. येथे सत्ताधारी भाजपला २५ जागा मिळाल्या असून झारखंड मुक्ती मोर्चा हा पक्ष ३० जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्या आहेत. २०१९ सालात महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तराखंड अशी पाच राज्ये गमावली आहेत.
Jharkhand: Counting of votes for #JharkhandAssemblyPolls to be done today. Visuals from a counting centre in Ranchi. pic.twitter.com/CgQU7edoV1
— ANI (@ANI) December 23, 2019