नक्षलवादामुळे संवेदनशील असलेल्या छत्तीसगडच्या दक्षिण भागातल्या बिजापूर जिल्ह्यात आज सीआरपीएफच्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. बिजापूर जिल्ह्यातल्या इरापल्ली गावामध्ये झालेल्या या चकमकीमध्ये सीआरपीएफच्या २०४ बटालियन कोब्रा पोस्टचे दोन जवान शहीद झाले आहेत. त्यासोबतच अजून दोन जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. इरापल्ली गाव नक्षलवादग्रस्त म्हणून ओळखलं जातं. अशा भागांमध्ये सीआरपीएफ आणि कोब्रा पोस्टच्या जवानांना कायम लक्ष्य करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या चकमकीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, या चकमकीमध्ये एक माओवादी देखील ठार झाल्याचं वृत्त असून त्याला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.
#UPDATE Chhattisgarh: Two CoBRA personnel of 204 battalion have lost their lives in the encounter with naxals at Irapalli village in Bijapur district. https://t.co/jFb2zHaKIb
— ANI (@ANI) February 10, 2020
दरम्यान, या घटनेनंतर नेटिझन्समध्ये तीव्र संताप दिसून येत आहे. अनेक भारतीयांनी ट्वीटरवर आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच, नक्षलवाद्यांना संपवण्यासाठी कठोरात कठोर पावलं उचलण्यात यावीत, अशी मागणी देखील काही नेटिझन्सनी केली आहे. काही ट्वीटर वापरकर्त्यांनी भारतीय हवाई दलाला या भागात हवाई कारवाई करण्याचे आदेश देण्याची देखील इच्छा व्यक्त केली आहे.
This is right time for carpet bomb them. Cos media is busy in Delhi election, and there will not be any survivor left to record the bombing incident in thick forest…
Just do it IAF what are you waiting for…— M² (@MKLmhr) February 10, 2020
नोटबन्दी से आतंकियों ओर नक्शलियो की कमर टूट गयी थी ? किसान कौम के बेटों को कब तक शहादत के नाम पर मरवाती रहेगी ये सरकार?
— Sandeep Choudhary (@sandeep_jjn) February 10, 2020
How many more?
Chhattisgarh's naxal problem is real, the state government gets immense fund to handle this issue at multiple levels.
We need to solve the root cause of this issue.
— Naveen Kumar (@naveenjindalbjp) February 10, 2020