बऱ्याच वेळा माणूस शुल्लक गोष्टीतून टोकाचं पाऊल उचलतो आणि जीवन संपवतो. ते म्हणतात ना आत्महत्या हा कायमच्या समस्येवरचा तात्पुरता उपाय आहे. तसाच काहीसा प्रकार गुरग्राममध्ये समोर आला आहे. घरातला राबता चालू होता. कामावरून थकून आल्यानंतर पत्नीनं त्याला पाणी दिलं. तो देखील हलकासा हसला. तसं पाहिलं तर चेहऱ्यावर दिसणारं ते हसू काहीसं गायब होतं. कामावरचा ताण असेल म्हणून पत्नीनं देखील थोडसं दुर्लक्ष केलं. कारण दरवेळी पत्नीनं विचारनं अनेक वेळा पुरूषांना पटत नाही. म्हणून असेल कदाचित पण पत्नी काही बोलली नाही. रविवारचा दिवस उजाडला. सुट्टीचा दिवस असल्यानं सर्व निवांत सुरू होतं. आठवड्यातील एकच दिवस सर्वांना एकत्र मिळतो म्हटल्यावर गप्पा झाल्या. हाहा म्हणता दिवस सरला. रात्र झाली. जेवणं उरकली. सर्वांनी झोपेची तयारी केली. रविवार असल्यानं पत्नी आणि मुलगा रात्री उशिरापर्यत टीव्ही पाहत बसली होती. पहाटेचे ३ वाजले. आणि बिल्डींग बाहेर काहीतरी जोरात पडल्याचा आवाज झाला. सुरक्षा रक्षकानं आरडाओरड केली. खूप धक्कादायक घडलं होतं. इमारतीच्या नवव्या मजल्यावरून नरेश हसिजा या ४७ वर्षिय व्यवसायिकानं उडी मारून जीवन संपवलं होतं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पण, नरेश यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप देखील कळू शकलेलं नाही. यानंतर गुरूग्राममधील सेक्टर ५० नंबर पोलिस चौकीत केस रजिस्टर करण्यात आली आहे.
गुरग्राममध्ये बिझनेसमॅननं संपवलं जीवन
written By My Mahanagar Team
Gurugram
गुरग्राममध्ये ४७ वर्षिय व्यवसायिकानं इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -