घरदेश-विदेशहार्दिक पटेल लोकसभा निवडणूक लढवणार; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

हार्दिक पटेल लोकसभा निवडणूक लढवणार; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

Subscribe

गुजरातमधील पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भाजपाला आव्हान देणारे हार्दिक पटेल लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

गुजरातमधील पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भाजपाला आव्हान देणारे हार्दिक पटेल लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच गुजरातच्या जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवणार असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. हार्दिक पटेल जामनगर मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडणुक लढवणार आहेत. या मतदारसंघात सध्या भाजपाच्या पूनमबेन मादम खासदार आहेत. येत्या १२ मार्चला अहमदाबाद येथे काँग्रेसची बैठक होणार आहे. यावेळी हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीदेखील उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते एका सभेला संबोधत करणार आहेत.

सपा-बसपा भाजपला हरवू शकते

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात असून पंतप्रधान होण्याआधी येथे तीन टर्म मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवले होते. तसेच गुजरात हा त्यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र याच राज्यात विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने त्यांना नाकीनऊ आणले होते. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला मोठी मदत केली होती. यामुळे काँग्रेस गुजरातमध्ये लक्ष केंद्रीत करणार आहे. हार्दिक पटेल यांनी २१ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष मुख्यालयात अखिलेश यादव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पटेल यांनी सपा-बसपा युतीचे स्वागत केले होते. तसेच ही युती भाजपाला हरवू शकते असेही म्हटले होते. लोक भाजपापासून त्रासलेले असून त्याना सुटका हवी आहे, असे वक्तव्य पटेल यांनी केले होते. महत्वाचे म्हणजे या युतीमध्ये काँग्रेसला वगळण्यात आले आहे.

- Advertisement -

पाटीदार समाजासाठी आरक्षणाची मागणी 

पटेल समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून २०१५ मध्ये आंदोलन उभे राहिले होते. यावेळी हिंसाही झाली होती. तसेच चिथावणी दिल्याने झालेल्या तोडफोडप्रकरणी हार्दिक पटेल यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. दरम्यान, हार्दिक पटेल यांनी यावेळी तथाकथीत गुजरात मॉडेलवरही टीका केली होती. आज जे गुजरात मॉडेल अवघ्या देशभरात खपवले जात आहे. त्याच गुजरातच्या २० जिल्ह्यांमध्ये शेतासाठी पाणी मिळणे मुश्कील बनले आहे. आज शेतकरी, तरुण, महिला सर्व त्रासलेले आहेत. जो ही सरकारला प्रश्न विचारतो त्याला देशद्रोही ठरविले जाते, असेही हार्दिक यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – 

सातोटे हत्याकांड प्रकरणातील सर्व सहा आरोपींची फाशी रद्द

- Advertisement -

शिवसेनेनं ‘करून दाखवलं’! – मनसे

यांचा ‘तो’ व्हिडिओ झाला व्हायरल…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -