राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (NCLAT) आज सायरस मिस्त्री यांच्या टाटा समूहाच्या कार्यकारी अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठा असा हा निर्णय आहे. टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नटराजन चंद्रशेखरन यांची निवड बेकायदा असल्याचा निर्णय लवादाने दिला आहे. सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाचे सहावे अध्यक्ष म्हणून २०१२ मध्ये निवड करण्यात आली होती. त्यानंतर २४ ऑक्टोबर २०१६ रोजी त्यांना बोर्डरुमधून बाहेर काढले होते. चार आठवड्यामध्ये मिस्त्री यांना पुन्हा अध्यक्षपदी बसवण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. यादरम्यान टाटा समूह पुन्हा एकदा लवादाकडे या निर्णयाविरोधात आव्हान देऊ शकते, तशी तरतूद आहे.