माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरवरून घणाघात केला आहे. मी देखील दलित आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यावर देखील अन्याय करत आहेत का? असा सवाल यशवंत सिन्हा यांनी केला आहे. मी लोकांना पूर्ण गोष्ट सांगतो, सीताराम केसरी दलित नव्हते ते ओबीसी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना दलित म्हटले आहे. देशाला असा अशिक्षित पंतप्रधान हवा का ? असा सवाल देखील यशवंत सिन्हा यांनी केला आहे. यापूर्वी देखील यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.
Like Sitaram Kesri I am also a Dalit. Why is Modi being unfair to me.
— Yashwant Sinha (@YashwantSinha) November 19, 2018
Why is Modi at war with every institution of democracy in our country? My way or the highway will cost him dearly, but that is not important. What is important is the damage it is doing to our polity.
— Yashwant Sinha (@YashwantSinha) November 16, 2018
का म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी
काँग्रेस आणि भाजपमध्ये सध्या घराणेशाहीवरून जोरदार वाकयुद्ध रंगल्याचं पाहायाला मिळत आहे. सीताराम केसरी हे दलित होते त्यामुळे त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवलं गेलं आणि अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांचा मार्ग मोकळा केला गेला. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छिंदवाडामध्ये केली होती. छत्तीसगडमधील निवडणूक प्रचारादरम्यान १९ नोव्हेंबर रोजी बोलत असताना त्यांनी ही टिका केली होती. त्यावर आता यशवंत सिन्हा यांनी टिका केली आहे. सीताराम केसरी हे दलित होते. म्हणून त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची ५ वर्षे देखील पूर्ण करता आली नाहीत. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केला होता. यापूर्वी दिल्लीतून चालणाऱ्या सरकारचं रिमोट कंट्रोल हे केवळ गांधी घराण्याच्या हाती होतं अशा शब्दात नरेंद्र मोदींनी सोनिया गांधी यांना लक्ष्य केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या टीकेला काँग्रेसनं देखाील उत्तर दिलं होतं. सीताराम केसरीजी दलित नव्हे तर वैश्य समुदायातून होते. केसरींनी स्वत:हून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मी त्यावेळी सीताराम केसरींचा राजकीय सल्लागार होतो. मला हे सर्व माहीत आहे, असे तारिक अन्वर यांनी म्हटलं होते.