भारताचा वाघ आज मायदेशी परतणार आहे. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशभराचे लक्ष वाघा बॉर्डरकडे लागले आहे. अभिनंदन यांची सुटका करणार असल्याची घोषणा काल पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केली होती. त्यानंतर आज अभिनंदन भारतात येणार असल्याने सर्वांना आनंद झाला आहे. वाघा बॉर्डरवर देशवासियांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -