घरदेश-विदेशपंतप्रधान मोदी अहंकारी, मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वक्तव्य

पंतप्रधान मोदी अहंकारी, मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वक्तव्य

Subscribe

शेतकर्‍यांच्या मुद्द्यावरून सतत केंद्र सरकारवर टीका करणारे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आता वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ’कृषी कायद्यांसंबंधी आपण पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी गेलो होतो. यावेळी दोघांमध्ये गंभीर वाद झाला आणि ५ मिनिटांत दोघांमध्ये भांडण झाले. पंतप्रधान मोदी अहंकारी आहेत, असे मलिक यांनी सांगितले.

हरयाणाच्या दादरीमध्ये एका सामाजिक कार्यक्रमाला सत्यपाल मलिक यांनी संबोधित केले. आपण जेव्हा शेतकर्‍यांच्या मुद्द्यावर पंतप्रधानांना भेटलो त्यावेळी ५ मिनिटांत आपले त्यांच्याशी भांडण झाले. त्यावेळी त्यांना फारच घमेंड होती. शेतकरी आंदोलनात ५०० जणांचा मृत्यू झाला, असे आपण त्यांना सांगितले. त्यावेळी ते म्हणाले, माझ्यासाठी मेलेत का ते? यानंतर आपण त्यांना म्हणालो, तुमच्यासाठीच तर मेलेत ते, कारण तुम्ही राजे झाले आहात ना. यावरून आपले त्यांच्याशी भांडण झाले, असे मलिक म्हणाले.

- Advertisement -

अमित शहांबद्दल दावा
पीए म्हणाले, आता तुम्ही अमित शहांना भेटा. यानंतर आपण अमित शहांची भेट घेतली, असं मलिक म्हणाले. कुत्रा मेला तरी पंतप्रधान मोदी शोक संदेश देतात. पण शेतकर्‍यांच्या मृत्युंवर मात्र ते गप्प आहेत, असं मलिक बोलले. काही लोकांनी पंतप्रधान मोदींची बुद्धी भ्रष्ट केली आहे. एकना एक दिवस हे, त्यांच्या (मोदींच्या) लक्षात येईल, असे अमित शहा आपल्याला भेटीत म्हणाले, असा दावा मलिक यांनी केला.

सत्यपाल मलिक हे सतत शेतकर्‍यांच्या प्रश्नावर केंद्र सरकार आणि भाजप नेतृत्वावर टीका करत आहेत. शेतकर्‍यांच्या मुद्द्यावरून राज्यपाल पदावरून हटवण्यासा आपण घाबरत नाही, असे वारंवार बोलत आहेत. मेघालयचे राज्यपाल होण्यापूर्वी ते जम्मू-काश्मीर आणि गोव्याचे राज्यपाल होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -