घरदेश-विदेशशेवटी देशाचेच नाव खराब होणार ,वेब पोर्टलबद्दल सुप्रीम कोर्टाकडून चिंता

शेवटी देशाचेच नाव खराब होणार ,वेब पोर्टलबद्दल सुप्रीम कोर्टाकडून चिंता

Subscribe

दिल्लीत कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेल्या वर्षी झालेल्या तबलीगी जमात मेळाव्यावरील मीडिया अहवालांविरोधात खटल्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली.

या देशातील प्रत्येक गोष्ट प्रसारमाध्यमांच्या एका वर्गाने विशिष्ट सांप्रदायिक दृष्टीकोनातून दाखवली आहे. यामुळे शेवटी देशाचेच नाव खराब होणार आहे. वेब पोर्टल फक्त शक्तिशाली लोकांचे आवाज ऐकतात आणि न्यायाधीश किंवा न्याय देणार्‍या संस्थांच्या विरोधात काहीही लिहतात, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले आहे.

दिल्लीत कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेल्या वर्षी झालेल्या तबलीगी जमात मेळाव्यावरील मीडिया अहवालांविरोधात खटल्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली. यावेळी कोर्टाने म्हटले की, माध्यमांनी दाखवलेल्या बातम्यांचे स्वरुप सांप्रदायिक होते आणि त्यामुळे देशाचे नाव खराब होऊ शकते. तसेच वेब पोर्टलवर कोणाचेही नियंत्रण नाही. ही गंभीर समस्या आहे, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी सांगितले. वेबसाइट आणि टीव्ही चॅनेलसाठी नियामक यंत्रणा आहेत का, असा सवालही त्यांनी केंद्र सरकारला विचारला. केंद्र सरकारच्यावतीने उत्तर देताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, माध्यमे सांप्रदायिक बातम्या ठरवून देतात. वेब पोर्टल्सवर नियंत्रण नसल्याने ते फेक न्यूज देखील चालवू शकतात.

- Advertisement -

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्सवरील फेक न्यूज संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. न्यायाधीश म्हणाले, पोर्टल आणि यूट्यूब चॅनेलवरील फेक बातम्यांवर कोणतेही नियंत्रण नाही. जर तुम्ही यूट्यूबवर गेलात तर तुम्हाला समजेल की कोणतीही भीती न बाळगता कशाप्रकारे फेक बातम्या केल्या जातात. शिवाय आजकाल कोणीही स्वतःचे यूट्यूबवर चॅनेल सुरू करतोय, असेही कोर्टाने म्हटले.

माध्यमांनी तबलिगी मेळाव्याचे प्रसारण एकतर्फी केले आणि मुस्लीम समाजाचे चुकीचे वर्णन केले, असा आरोप जमीयत उलेमा-ए-हिंद, पीस पार्टी, डीजे हल्ली फेडरेशन ऑफ मस्जिद मदारीस, वक्फ इन्स्टिट्यूट आणि अब्दुल कुद्दुस लासकर यांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -