‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रामुळे बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता नेहमी चर्चेत असतात. या आत्मचरित्रामधून नीना गुप्ता यांनी आपल्या चित्रपटसृष्टीतील करिअर व्यतिरिक्त खासगी आयुष्यासंबंधित अनेक खुलासे केले आहेत. नीना गुप्ता यांनी ‘सच कहूं तो’मध्ये लहानपणी झालेल्या विनयभंगाविषयी बोलल्या आहेत. त्या म्हणाल्या की, लहान असताना त्यांचे डॉक्टर आणि टेलरने विनयभंग केला होता.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नीना गुप्ता यांनी सांगितले की, ‘याबाबत त्यांनी आपल्या आईला काहीच सांगितलं नाही. कारण नीना गुप्ता यांना भीती होती की, त्यांची आईने त्यांची चूक काढू नये.’ तसेच नीना गुप्ता यांना या दोन घटनेचा उल्लेख करत लिहिले आहे की, ‘जेव्हा ऑप्टिशियन जवळ गेल्या होत्या, त्यावेळेस डॉक्टराने विनयभंग केला. तेव्हा त्यांच्या भावाला बाहेर प्रतिक्षा कक्षेत बसण्यास सांगितले होते.’
नीना गुप्ता यांनी पुस्तका लिहिले आहे की, ‘डॉक्टराने माझ्या डोळ्याची तपासणी करण्यास सुरुवात केली आणि काही वेळानंतर डॉक्टर माझ्या डोळ्यासंबंधित इतर गोष्टींची तपासणी करण्याच्या बहाण्याने खाली इतर जागांची तपासणी करू लागला. जेव्हा हे सर्व घडत होते, तेव्हा मी खूप घाबरले होते. मी घरातील एका कोपऱ्यात बसले आणि कोणी पाहत नसताना मी रडत राहिले. याबाबत मी माझ्या आईला सांगण्याची हिंमत केली नाही. माझ्यासोबत अनेक वेळा अशाप्रकारे डॉक्टरांनी केले आहे.’
टेलरने सुद्धा नीना गुप्ता यांच्यासोबत विनयभंग केला होता. शरीराचे माप घेताना टेलरने त्यांच्यासोबत छेडछाड केली होती. हे सर्व अनुभव घेऊन त्या आयुष्य जगत होत्या.
नीना गुप्ता यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर लवकर त्यांचा ‘ऊंचाई’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री परिणिती चोप्रा, अमिताभ बच्चन, अनुमप खेर, बोमन इरानी, सारिका आणि डॅनी असे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान ‘ऊंचाई’च्या शूटिंगसाठी पाचशे लोकांचे युनिट हिमालय आणि नेपाल दुर्गम भागात पोहोचली आहे. राजश्री प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे.
हेही वाचा – Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात ईशान सहगलने मायशा अय्यरला केलं प्रपोज, फराह खानने उडवली खिल्ली