कंगना राणावतचा (Kangana Ranaut) लॉकअप (Lockup) शोमध्ये अनेक वाइल्ड कार्ड एंट्री केली आहे. यामध्ये मंदना करिमी, चेतन हंसराज, जिशान खान, तर सारा खानचा एक्स पती अली मर्चेंट आणि विनीत कक्कड या कलाकारांनी लॉकअपमध्ये एंट्री केली. या आठवड्यामध्ये दोन कलाकार एलिमिनेट झाले आहेत. लॉकअप शोमधून सायशा शिंदे(Saisha Shinde) पहिलीच बाहेर गेली असून, आता एक आश्चर्यचकीत असं एलिमिनेशन झाले आहे. कंगना राणावतच्या लॉकअपच्या शोमधून विलेन करणवीर बोहरा (Karanvir Bohra) बाहेर गेला आहे. करण बोहरा बाहेर जाणार समजल्याने सर्व कंटेस्टंट भावूक झाले आहेत.
करणवीरचे शॉकिंग एलिमिनेशन झाल्याने विशेष करून अंजली अरोडा आणि पूनम पांडे भावूक झाल्यात. यावेळी पूर्ण निळा टीम भावूक झाल्याचे दिसते आहे. जिशान खान (Zeeshan Khan) आणि विनीत कक्कड (Vineet Kakkad) यांची नुकतीच वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती. त्यांनी दोन्ही वाईल्ड कार्ड एंट्रीना (Wild card entry) बॅग रूममध्ये बोलावून त्यांना कोणत्या संघात सहभागी व्हायचे आहे, असे विचारले तेव्हा त्यांनी त्यांच्या आवडीची नावं फलकावर लिहिली. आणि त्यांना एक विशेष पावर दिली आहे. ती पावर म्हणजे ते एकाला एलिमिनेशन करू शकतात.
View this post on Instagram
जिशान आणि विनीत यांनी आरोपपत्रावर त्या स्पर्धकाचे नाव लिहून त्याला अनलॉक करायचे होते. त्यानंतर सर्व स्पर्धकांना मोकळ्या जागेत बोलवून त्यांना सांगण्यात आले. करणवीर बोहराच्या बाहेर जाण्यामागे जीशान आणि विनीत हे कारण होते.
यावेळी जीशान यानी नारंगी संघामध्ये सहभागी झाला असून विनीतने निळा संघात सहभागी झाला आहे. त्यावेळी त्यांनी करणवीर बोहराला लॉकअपमधून बाहेर काढल्याचे सांगितले.
करणवीर बोहराचे नाव ऐकल्याने शिवम, मुनव्वर, पूनम आणि अंजली सर्व रडायला लागले. करणवीरला वचन देताना मुनव्वर फारुकी म्हणाला की जीशान आणि विनीत या दोघांचा बदला घेऊन त्यांना खरोखर तुरुंगात टाकेल. करणवीर सर्व स्पर्धकांना मिठी मारतो आणि कंगना राणौतच्या लॉकअपमधून बाहेर पडला.