अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह, गोवा, कोकण आणि इतर राज्यांमध्ये पावसाने उग्र रुग धारण केले आहे. याचा सर्वाधिक फटका हा समुद्र किनारपट्टी लगत असणाऱ्या भागांना बसला असून मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान लवकरचं हे वादळ गुजरातच्या किनारपट्टी भागात धडकणार असून यापूर्वीच गुजरातमधील काही भागांमध्ये मोठ्याप्रमाणात पावसासह वादळी वाऱ्य़ाला सुरुवात झाली आहे.
View this post on Instagram
या चक्रीवादळाचा फटका गुजरातमधील सिलवासा येथे सुरू असलेल्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या सेटला बसला आहे. मुंबईत लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे शूटिंग बंद झाल्या. त्यामुळे अनेक मालिकांचे शूटिंग सध्या गुजरातच्या सिलवासामध्ये सुरु आहे. तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या सिलवासाला बसला आहे. दरम्यान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान सेटवर जोरदार वादळी वारे वाहू लागल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाला होता. . यामध्ये मालिकेच्या सेटचेही मोठे नुकसान झाले आहे. सेटवरील क्रू मेंबरकडून तातडीने जमेल ते साहित्याचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी धावपळ सुरु झाली. सुदैवाने या घटनेत कोणताही दुखापत झालेली नाही.
या मालिकेतील अभिनेता करण कुंद्रा याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या मालिकेच्या सेटला वादळाचा तडाखा बसल्यानंतचे फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये सेटवरील क्रू मेंबर्स साहित्य वाचवण्यासाठी धावपळ करत आहेत. परंतु यामध्ये सेटचे झालेले नुकसान स्पष्टपणे दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बिकनीवर सायकलिंग करणाऱ्या कृष्णा श्रॉफचे सोशल मीडियावर वादळ