*अंजीर शक्तीवर्धक असून पचनास जड पण शितदायी आहे.
*सुक्या अंजिरामधील लोहामुळे आपले शरीर आणि जठर क्रियाशील बनते, परिणामत: भूक लागते.
*अंजीर पित्तविकार, वायुविकार आणि रक्तविकार दूर करते.
*अंजिराच्या रोजच्या सेवनाने मलावरोध नाहीसा होतो.
*अंजीर सकाळ-संध्याकाळ दुधात गरम करून खाल्ल्याने कफाचे प्रमाण कमी होते तसेच दम्याचा विकार नाहीसा होतो.
*शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठीही अंजीर उपयोगी पडते.
*घरामध्ये लहान बालकाने चुकून काचेचा तुकडा गिळला तर तत्काळ अंजिरे खाऊ घालावी. या उपायाने काचेचा तुकडा गुदद्वारावाटे बाहेर पडतो.
*अंजीर हृदयरोगावरही गुणकारी आहे. पचनास जडही आहे.
लक्षात ठेवा- अंजीर पचनास जड जाते त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटात दुखणे सुरू होऊ शकते. म्हणून अंजीर खाताना योग्य प्रमाण लक्षात घ्यावे. जास्त पिकलेले अंजीर खाणे आरोग्यासाठी बाधक ठरते.