मुंबईमध्ये मास्क न लावणं एका व्यक्तीला महागात पडलं आहे. मास्कला विरोध केला म्हणून त्याच्यावर तलवार आणि चाकूने हल्ला करण्यात आला. या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून राजावाडी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा शोध घेत आहेत. मुंबईतील टिळक नगर पोलिस ठाण्याच्या परिसरातील घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी काही लोक मास्क न लावता आणि शारीरिक अंतर न ठेवता भाजी खरेदी करत होते. यावर नवनीत राणा नावाच्या व्यक्तीने आक्षेप घेतला. यानंतर नियम मोडणाऱ्या लोकांनी भांडण करायला सुरूवात केली.
हेही वाचा – घरी परतणाऱ्या कामगारांचा रेल्वे प्रवासाचा खर्च कॉंग्रेस करणार – सोनिया गांधी
यानंतर रविवारी सायंकाळी आठच्या सुमारास काही लोक हातात तलवार व चाकू घेऊन नवनीत राणा यांच्या घरी पोहोचले. दरम्यान, नवनीत घरी नव्हता. मात्र या लोकांनी नवनीतच्या दोन भावांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, आरोपींचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.