घरCORONA UPDATEकोरोनाचा जास्त प्रादुर्भाव नसलेल्या भागात सोमवारपासून उद्योगधंदे सुरू होणार!

कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव नसलेल्या भागात सोमवारपासून उद्योगधंदे सुरू होणार!

Subscribe

राज्यासह देशात सध्या कोरोनाचे संकट असून लॉकडाऊन आहे. मात्र आता मुंबई आणि परिसरातील महानगरपालिकांचे क्षेत्र वगळून कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव नसलेल्या भागातील उद्योग येत्या सोमवारनंतर सुरू करण्याचे संकेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी दिले. कोरोनामुळे ठप्प झालेले उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग विभागाने स्थापन केलेल्या कृती गटातील अधिकाऱ्यांची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, संचालक वैद्यकीय शिक्षण, तात्याराव लहाने, संचालक एनआरएच एम अनुपकुमार यादव आदी उपस्थित होते. यावेळी कोरोनामुळे बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत आढावा घेण्यात आला.

उद्योगांना आर्थिकदृष्ट्या चालना मिळावी, यासाठी केंद्र सरकारने पाठविलेल्या मार्गदर्शक सूचना महत्वाच्या आहेत. या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन येत्या २० तारखेनंतर राज्यातील कोणत्या भागांतील उद्योग सुरू करता येतील, याचा आज आढावा घेऊन एक सूत्र तयार केले आहे. ज्या भागात कोरोनामुळे प्रतिबंध लागू आहेत, अशा ठिकाणी उद्योग सुरू करता येणार नाहीत.

- Advertisement -

या भागात उद्योगधंदे सुरू होणार नाहीत…

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, वसई-विरार, भिवंडी, पुणे- चिंचवड तसेच नागपूर या भागांमध्ये उद्योगधंदे सुरू करता येणार नाहीत असे उद्योगमंत्र्यांनी सांगितले. तसेच इतर ठिकाणी आरोग्य विभाग वआणि स्थानिक प्रशासनाशी सल्लासलत करून परिस्थितीनुसार २१ तारखेच्या आसपास उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल असे उद्योगमंत्र्यांनी सांगितले. तसेच उद्योग विभागाच्या कृतीदलाने याबाबत तयार केलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -