घरमहाराष्ट्रशरद पवारांनी आत्मचिंतन करावं - मुख्यमंत्री

शरद पवारांनी आत्मचिंतन करावं – मुख्यमंत्री

Subscribe

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सरकारवर केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांनी आत्मचिंतन कराव, असे म्हणत त्या आरोपांना उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य आणि केंद्र सरकारवर अनेक गौप्यस्फोट केले. सरकारवर जोरदार टीका देखील करण्यात आल्या. या टीकेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. ‘भाजप सरकार कोणावरही दबाव टाकत नसून दबाव टाकून लोकांना पक्षात घेण्याची भारतीय जनता पक्षाला गरज नाही. शरद पवार यांच्या पक्षात लोक का राहायला तयार नाहीत, यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने आत्मचिंतन करावे‘, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांना टोला लगावला आहे. तसेच ज्या नेत्यांची ईडी चौकशी करत आहे, अशा लोकांना भारतीय जनता पक्षात कधीही घेतले जाणार नाही. जे चांगले आहेत. जे लोकांची कामे करतात त्यांनाच पक्षात घेतले जाईल, असेही फडणवीस यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना पवारांच्या टीकेला उत्तर देताना म्हटले आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्री स्वत: आमदारांना फोन करताहेत – पवार

- Advertisement -

दबाव टाकून पक्षात घेण्या इतका आमच्याकडे वेळ नाही

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर होत आहे. दबाव टाकून पक्षांतर केले जात आहे‘, असा आरोप पवारांनी केल्यानंतर मुख्यमंत्री त्यावर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार येण्यास उत्सुक आहेत. मात्र, ज्यांची ईडीमार्फत चौकशी सुरु आहे, अशांना आम्ही घेणार नाही. कुणावर दबाव टाकून पक्षात घेण्याइतका आमच्याकडे वेळ नाही. तसेच भारतीय जनता पक्ष कुणाच्या मागे धावेल अशी पक्षाची स्थिती नाही‘, असे म्हणत फडणवीसांनी पवारांना टोला लगावला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने कधीही दबावाचे राजकारण केले नाही. तसेच आमच्याकडे मोदी यांच्यासारखा मोठा नेता आहे, त्यामुळे पवारांनी लोक का बाहेर जातत याबाबत आत्मचिंतन करावे, असे टोला पवारांना लगावला आहे.


हेही वाचा – ‘आमचं खत चांगलं आहे’; आदित्य यांचा शरद पवार यांना टोला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -