मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली असून आदित्य ठाकरेही सक्रिय झाले आहेत. अनेक आमदार, खासदारांसह आता काँग्रेसच्या नेत्यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. सावंत यांनी मुंबईतील दहिसर विधानसभा मतदारसंघाची काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र, आता अरुण सावंत हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
आपणा सर्वांचे आभार….@NANA_PATOLE @INCMaharashtra @INCMumbai @INCIndia @RahulGandhi pic.twitter.com/NeQeGkrn29
— Arun Vasant Sawant – अरुण वसंत सावंत (@ArunSawant_says) July 25, 2022
नाशिक जिल्ह्यातील येवला विभागातील युवसेना तसेच पालघर, विक्रमगड, दहिसर, चांदीवली येथील शिवसेना, काँग्रेस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज भेट घेऊन युती सरकारला पाठिंबा दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला विभागातील युवासेना तसेच पालघर, विक्रमगड, खालापूर, दहिसर, चांदीवली येथील शिवसेना, काँग्रेस आणि मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला. pic.twitter.com/TZIV8gDHxA
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 24, 2022
काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील ५८ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेत नव्याने स्थापन झालेल्या युती सरकारला पाठिंबा जाहीर केला होता.
हेही वाचा : बहुमत आहे तर मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? अजित पवारांचा सवाल