घरमहाराष्ट्र३० एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम-मुख्यमंत्री

३० एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम-मुख्यमंत्री

Subscribe

कामगारांचे,परीक्षांचे काय ? यावर १४ एप्रिलला बोलणार

करोनाविरोधातील लढा यशस्वीपणे जिंकण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत असलेले लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात येत असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. आपण बंधने पाळली, घराबाहेर पडलो नाहीत, तर आपण ३० तारखेला यशस्वी होऊ शकतो. तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो, असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी नागरिकांना केले. या काळात कामगारांचे काय होणार? परीक्षांचे काय होणार? असे अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यावर १४ एप्रिलला मी बोलेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरसिंग झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये मला सर्वात आधी बोलण्याची संधी देण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी आपण महाराष्ट्रात १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन कायम ठेवण्यासंबंधी भूमिका मांडल्याचे सांगितले. तसेच राज्यातील करोना परिस्थितीबाबत पंतप्रधानांना अवगत करत त्यांना राज्यातील चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे सांगितले. सुमारे ३३ हजार चाचण्या घेण्यात आल्या असून १५७४ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत तर ३० हजार ४७७ जणांचे निगेटिव्ह आहेत. १८८ रुग्ण बरे करून घरी पाठवले असल्याची माहिती पंतप्रधानांना दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

बाधित क्षेत्रांसाठी आम्ही तत्काळ तपासणी, अलगीकरण, विलगीकरण धोरण याची परिणामकारक अंमलबजावणी करीत असल्याने संख्या वाढत असली तरी फैलाव रोखण्याचा आम्ही चांगला प्रयत्न करीत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मृत्यूदर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असला तरी जास्तीतजास्त मृत्यू अति धोका गटातील ज्येष्ठ आणि ज्यांना इतरही काही आजार आहेत यांचे झाले आहेत.

राज्यातील तपासणीसाठी आलेल्या ७० टक्केे लोकांत लक्षणे दिसत नाहीत. यातील रोज १५० लोकांना आम्ही प्राथमिक उपचार करून बरे करून पाठवत आहोत. राज्यात कोविड उपचारांसाठी तीन स्तरावर व्यवस्था केली असून अगदी सर्दी, ताप, न्यूमोनिया लक्षणांसाठी कोविड केअर सेंटर, मध्यम स्वरूपाच्या लक्षणांसाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि गंभीर रुग्णांसाठी डेडिकेटेड कोविड रुग्णालयातून उपचार करीत आहोत अशी माहितीही त्यांनी दिली

- Advertisement -

मुंबई, पुणे वगळता इतर ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात                                                                   राज्यात मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी संख्या वाढत असली तरी इतरत्र परिस्थिती नियंत्रणात हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्याचे उदाहरण दिले. परराज्यातील सुमारे ६ लाख श्रमिक, कामगार, स्थलांतरित यांना निवारा केंद्रातून दोन वेळचे जेवण, नाश्ता देण्यात येत आहे. पूल टेस्टिंग किंवा ग्रुप टेस्टिंग बाबत केंद्राने विचार करावा त्याचप्रमाणे सारी रोगाच्या प्रादुर्भावाकडेही आमचे लक्ष आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पीपीई किट, एन ९५ मास्क, इतर वैद्यकीय उपकरणे लवकरात लवकर मिळावेत, अशी मागणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -