घरताज्या घडामोडीमालाला हमीभाव मिळाल्याशिवाय माघार नाही, शेतकरी नेत्यांचा इशारा

मालाला हमीभाव मिळाल्याशिवाय माघार नाही, शेतकरी नेत्यांचा इशारा

Subscribe

महापंचायतीत करण्यात आलेल्या मागण्या...

मुंबई –  शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला हमीभाव (एमएसपी) घेतल्याशिवाय शेतकरी माघार घेणार नाही, असा इशारा रविवारी शेतकरी नेत्यांनी दिला. तसेच शेतकरीविरोधी कायदे संसदेत मागे घेतल्यावरच दिल्लीतील शेतकरी आंदोलन मागे घेऊ, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यावेळी जाहीर केले. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्यावतीने आज आझाद मैदानात किसान -मजदुर -महापंचायत पार पडली. या महापंचायतीत हमीभावासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या महापंचायतीस जवळपास १० हजार शेतकरी उपस्थित हाेते.

यावेळी भारतीय किसान युनियनेचे नेते राकेश टिकैत यांनी आताचे पंतप्रधान आणि तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०११ मध्ये हमीभावाची मागणी केली होती, याकडे लक्ष वेधले. हमीभाव कायदा सरकारने देशात लागू करावा, तसेच सरकारने शेतकऱ्यांसोबत संवाद साधावा, अशी भूमिका टिकैत यांनी मांडली. दिल्लीचा राजा महालाचे दरवाजे बंद करुन बसला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

- Advertisement -

शेतकरी आंदोलनात ७०० जण शहीद झाले. मोदींनी घोषणा करताना देशाची माफी मागितली आहे. मात्र, हमीभाव घेतल्याशिवाय शेतकरी आता शांत बसणार नाही. येत्या ७ डिसेंबरला संसदेत काय होत हे पाहून पुढचा निर्णय घेऊ, असे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी यावेळी सांगितले.तसेच मोदींची वापसी सुरु झाल्याचा दावा त्यांनी केला.

शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले की, शेतकऱ्यांनी वर्षभर संघर्ष करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या लढ्यातून शेतकऱ्यांनी आत्मसन्मान मिळवला. एमएसपीची मागणी जुनीच आहे, जी २०११ मध्ये पंतप्रधानांनी स्वत: मुख्यमंत्री असताना केली होती. शेतकऱ्यांना एमएसपी मिळेपर्यंत आमचा संघर्ष जारीच राहील, असे यादव यांनी स्पष्ट केले.
या महापंचायतीस युद्धवीर सिंग, हन्नन मोल्ला, तेजंदर सिंग, जसबीर कौरनाट, आशीष मित्तल, शेकपाचे भाई जयंत पाटील, काॅ. अशाेक ढवळे, जे.पी. गावीत आदी उपस्थित होते.

- Advertisement -

२१ नोव्हेंबरला शेतकरी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या सहा मागण्यांबाबत पत्र लिहिले आहे. त्या पत्रावरील सरकारच्या उत्तराचे विश्लेषण करुन मोर्चाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी ४ डिसेंबर रोजी दिल्लीत बैठक बोलावली आहे, अशी माहिती मोर्चाचे नेते दर्शन पाल यांनी दिली.

अस्थींचे विसर्जन

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शहीद झालेल्या शेतकऱ्यांची अस्थीकलश यात्रा राज्यात ३० जिल्ह्यातील भ्रमणानंतर आज हुतात्मा चौकात पोचली. १०६ हुत्मात्यांना अभिवादन करुन यात्रेचा आज समारोप करण्यात आला. महापंचायत झाल्यानंतर शहीद शेतकऱ्यांच्या अस्थीचे गेटवे आॅफ इंडियाजवळ समुद्रात विसर्जन केले करण्यात आले.

महापंचायतीत करण्यात आलेल्या मागण्या

  • दिल्लीतील आंदोलनात बळी गेलेल्या ७०० शेतकऱ्यांच्या वारसांना नुकसान भरपाई द्यावी.
  • सीड बील लागू करु नये. शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत आणि आंदोलकांशी चर्चा करावी.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -