घरठाणेठाण्यातील घटना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच; संजय राऊतांचा आरोप

ठाण्यातील घटना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच; संजय राऊतांचा आरोप

Subscribe

ठाण्यात घडणाऱ्या सर्व घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच होत आहेत, असा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांवर आरोप केला आहे.

सोमवारी (ता. ०३ एप्रिल) रात्री ठाण्यामध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. याआधी देखील ठाण्यात शिवसेना आणि ठाकरे गटातील राडा हा हाणामारीपर्यंत गेलेला आहे. पण ठाण्यात घडणाऱ्या या सर्व घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच होत आहेत, असा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांवर आरोप केला आहे.

ठाण्यात झालेल्या राड्याविषयी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, बेदम मारहाण आम्ही पण करू शकतो. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना होणारी ही बेदम मारहाण पोलिसांच्या संरक्षणात होत आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात, म्हणून तुम्हाला हे सांगण्यात येत आहे. तुम्ही जे बाजार बुणगे बोलत आहात, पण या ठाण्यातील बाजार बुणग्यांना गृहमंत्र्यांनी हिंमत असेल तर आवरावे. जर तुमच्या मनगटामध्ये स्वाभिमानी रक्त असेल तर ठाण्यात घडणाऱ्या घटना थांबवाव्यात, असे आव्हान राऊत यांच्याकडून फडणवीस यांना देण्यात आले आहे.

- Advertisement -

तसेच, ठाण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्य आहे की नाही. एका महिलेवर काही महिलांकडून हल्ला करण्यात येतो. मग पोलीस आयुक्तांनी काय हातात बांगड्या भरल्या आहेत का? असा संतप्त प्रश्न राऊत यांच्याकडून यावेळी उपस्थित करण्यात आला. ठाण्यातील पोलीस गुंड टोळीत सहभागी झाले आहेत का? पोलिसांना घरात बसवा मग हल्ले काय असतात, हे आम्ही तुम्हाला सांगतो, असा इशारा राऊत यांच्याकडून देण्यात आला आहे.

ठाण्यात घडणारे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने..
ठाण्यात जे काही राडे आणि हल्ल्याच्या घटना घडत आहेत, त्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होत असल्याचा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. हल्ल्याच्या घटना फक्त ठाण्यातच का घडत आहेत, कारण संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांना पुरून उरलो आहोत. ठाण्यातील यंत्रणा ही गुलाम बनली आहे कारण मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत. ठाण्यात जर का आम्ही घुसलो तर तुम्हाला स्वतःला घरात कोंडून घ्यावे लागेल, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

देशातील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार
देशात २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. पण देशातील ज्या राज्यात भाजपला सत्ता न येण्याची भीती आहे, त्या राज्यात त्यांच्याकडून दंगा घडविण्यात येत असल्याचे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले. प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी, बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी हे या सरकारला टक्कर देत असल्याने भाजपकडून या कुरघोडी करण्यात येत आहेत, असा आरोप राऊत यांच्याकडून केंद्र सरकारवर करण्यात आला.


हेही वाचा – ‘उबाठा’च्या महिलेला मारहाण, आव्हाडांचा पोलिसांवर निशाणा; म्हणाले, ‘पोलिसांचे ठाण्यात अस्तित्व नाही’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -