घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : प्रत्येक टप्प्यात मोदींचं महाराष्ट्रात येणं, हाच मराठ्यांचा विजय...

Lok Sabha 2024 : प्रत्येक टप्प्यात मोदींचं महाराष्ट्रात येणं, हाच मराठ्यांचा विजय – मनोज जरांगे

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 च्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन व्हावे यासाठी भाजपसह, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

जालना : लोकसभा निवडणूक 2024 च्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन व्हावे यासाठी भाजपसह, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शर्तीचे प्रयत्न करत आहेत. अशात, पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात सभा घेत आहेत. मोदींच्या या सभेवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024 Maratha Leader Manoj Jarange Patil Slams PM Narendra Modi)

“लोकसभा निवडणुकीत मी नाही. मराठा समाजाने आता ठरवायचे आहे. समाजाचा आता नाईलाज आहे. आम्ही कुणाला पाठिंबा दिलेला नाही. जो सगेसोयरे या विषयाच्या बाजूने आहे. त्यांचा विचार करा. जो सगे सोयरे विषयाच्या बाजूने नाही त्यांना असे पाडा की त्यांच्या दोन तीन पिढ्या पुन्हा वर येऊ नये. मोदी साहेबांना इकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. मोदी साहेब शक्यतो स्वतःचं चिन्ह सोडून कधीच दुसऱ्याच्या प्रचाराला गेले नाहीत. मराठा समाजाच्या एकीची भीती निर्माण झाली आहे. इथच मराठा जिंकला की, त्यांना प्रत्येक टप्प्यात मोदी यांना आणावे लागतय. म्हणजे यांना मराठ्यांची प्रचंड भीती आहे”, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा – HEAT WAVE ALERT : वाढत्या तापमानाचा मतदानावर परिणाम; वेळ बदलण्याची काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे सांगलीत असताना त्यांच्या गाडीला अज्ञाताकडून चपलांचा हार घालण्यात आला. शिवाय, गाडीवर शाईफेक करण्यात आली. याबाबत मनोज जरांगे पाटलांना विचारले असता, “प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. असे कुणीच कुणाशी करू नये. काही जण असे आहेत की, ते स्वतः करतात आणि मराठ्यांवर नाव घालतात. काही जण सहानुभूती मिळवण्यासाठी असे कटकारस्थान करत आहेत. मराठा असो किंवा ओबीसी असे कुणीही करू नये. मराठ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. मराठा एकटे दुश्मन आहेत का फक्त? ते ही मराठ्यांच्या मागे का लागलेत? ओबीसी मतं मिळवायला काही ठिकाणी स्टंट होत आहे. हा स्टंट असू शकतो. त्यांनी काही ठिकाणी स्टंट करून सहानुभूती मिळवायला नको”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : शहा-योगींनी कोकणात येऊ नये, अन्यथा…; भास्कर जाधवांचा इशारा

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -