घरताज्या घडामोडीभाजपने काही पोपट पाळलेत.., संजय राऊतांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

भाजपने काही पोपट पाळलेत.., संजय राऊतांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

Subscribe

मागील काही दिवसांपासून भाजप आणि मनसेमध्ये जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. भाजपने काही पोपट पाळले आहेत. ते बोलत असतात. राज ठाकरे हे विश्वनेते आहेत, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.

भाजपने एवढे पोपट पाळून ठेवले आहेत. त्यांना बोलू दया. तसेच त्यांना पोपटपंची करू द्या. नोटबंदीच्या रांगेत हजारो लोक मेले हा सदोष मनुष्यवधच आहे ना?, त्यावरही या भाजपच्या पोपटांना बोलायला सांगा. गंगेत हजारो प्रेतं वाहत आली. गुजरातला स्मशानात जागा नव्हती. मग गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज ठाकरे यांनी करायला हवी. ते जगाचे नेते आहेत. ते ट्रम्पवरही बोलू शकतात. मग करा मागणी, असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली.

- Advertisement -

नेत्यांना शाही मेजवानी, श्रीसदस्य उपाशी

नेत्यांना शाही मेजवानी तर बाहेरचे लोक उपाशी मेले. या शाही मेजवानाची चौकशी करणार आहेत का? महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना विधानसभेत बोलण्याची संधी मिळाली पाहिजे प्रत्येकाकडे वेगळी माहिती आहे. खारघरच्या हत्याकांडावर एक- दोन दिवसाचं अधिवेशन घ्या, तुम्ही साधू कांड पालघर झालं त्यावेळी स्पेशल अधिवेशाची मागणी केली होती. खारघरमधील हत्याकांडावर सरकार बोलायला तयार नाही. मुख्यमंत्री तोंड उघडत नाहीत, मुख्यमंत्री बोलत नाहीत उपुख्यमंत्रीदेखील यावर भाष्य करत नाहीत, असेही राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : “नेत्यांना शाही मेजवानी, श्रीसदस्य उपाशी; लाईट अॅण्ड शेड्स कंपनीत भागीदार कोण शोधा”; राऊतांचा गंभीर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -