हेल्मेटसक्ती राबविणार्या पोलीस यंत्रणेचे कायदा व सुव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटत आहे. पोलीस आयुक्तांची बदली करण्यात यावे, अमोल इघे हत्याप्रकरणी न्याय न मिळाल्यास भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी माजी मंत्री भाजप नेते जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था आणि नाशिक पोलीस अपयशी ठरले असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार अॅड. राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, नगरसेवक दिनकर पाटील, विजय साने, प्रदीप पेशकार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
|
|