घरमहाराष्ट्रसिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक; पाऊस मुबलक, पण नैसर्गिक आपत्तीचे संकेत

सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक; पाऊस मुबलक, पण नैसर्गिक आपत्तीचे संकेत

Subscribe

Siddheshwar Yatra | सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा होमविधी आटोपल्यावर रात्री मानाचे सात नंदीध्वज डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोर विसावले.

Siddheshwar Yatra | सोलापूर – यंदाचेही वर्ष नैसर्गिक आपत्तीत जाणार असल्याचे संकेत सोलापुरातील श्री सिद्धेश्वर यात्रेच्या भाकणुकीतून मिळाले आहेत. तसंच, यंदा पाऊस मुबलक पडणार असल्याचेही भाकित मिळाले आहे. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात झाली असून सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील होम विधीचा सोहळा रविवारी रात्री संपन्न झाला.

सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा होमविधी आटोपल्यावर रात्री मानाचे सात नंदीध्वज डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोर विसावले.

- Advertisement -

भाकणूक कशी करतात?

यात्रेसाठी देशमुखांच्या शेतातील वासराला उपाशी ठेवले होते. या वासराला भाकणूकस्थळी आणले जाते. या वासराची राजशेखर देशमुख यांनी पूजा केली. या वासराने सुरुवातीलाच मूत्र आणि मल विसर्जन केले. त्यामुळे भरपूर पाऊस पडणार असल्याचे बोलले जाते. तसंच, वासरू सुरुवातीपासूनच बिथरले होते. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचे संकेत आहेत. वासरू गेल्या २५ वर्षांत जेवढं बिथरलं नव्हतं तेवढं यावेळी बिथरले. त्यामुळे हे नैसर्गिक आपत्तीचे लक्षण असल्याची प्रतिक्रिया मानकरी हिरेहब्बू यांनी दिली.

- Advertisement -

हिरेहब्बू म्हणाले की, “मागील 25 वर्षात मी पहिल्यांदाच वासरूला इतक्या आक्रमक रूपात पाहिले आहे. हे नैसर्गिक आपत्तीचे लक्षण आहे. 1993 साली किल्लारीच्या भुकंप आधी देखील वासरू अशाच प्रकारे बिथरलेले होते. त्यानंतर पाहिल्यांदाच अशा पद्धतीने वासरू बिथरले असून जोरजोरात ओरडत होते. त्यामुळे हे नैसर्गिक आपत्तीचे संकेत देणारे आहे.

उपाशी ठेवलेल्या वासराला गूळ, गाजर, बोरं, खोबरं, खारीक, पान, सुपारी आणि विविध प्रकारचे धान्य खाण्यास दिले होते. मात्र, या वासराने कशालाच स्पर्श केले नाही. यावरून सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहणार आहेत, असं सांगितलं गेलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -