घरताज्या घडामोडीबेशरम १ अब्ज २३ कोटी लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान, संभाजी भिडेंचे पुन्हा...

बेशरम १ अब्ज २३ कोटी लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान, संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Subscribe

जगाच्या पाठीवर निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलं आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संभाजी भिडे चर्चेत असतात पुन्हा एकदा बोलताना भिडेंची जीभ घसरली आहे. कोरोनामुळे जी लोकं मरतात ती जगायच्या लायकीची नाहीत असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केल होते. संभाजी भिडेंच्या वक्तव्यामुळे टीकेची झोड उठली होती पुन्हा एकदा जाहीर कार्यक्रमादरम्यान संभजी भिडेंनी वादग्रस्त विधान केल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात खळबळ माजली आहे. जगात कशात नाही जमले ते एका गोष्टीमुळे आपला क्रमांक १ नंबरमध्ये लागतो असे संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

शिवप्रतिष्ठानचे संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी कार्यक्रमादरम्यान म्हटलं आहे की, “जगात १ क्रमांकची लोकसंख्या असलेला देश चीन, मग आपला देशाचा क्रमांक १ कधी येणार, तो क्रमांक आपण मिळवला आहे. पण तो कोणत्या गोष्टीत लोकसंख्येमध्ये जमलं नाही आपल्याला चीन त्यात पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन, वैरी आहे. पण हिंदूंना मेंदू असतो आपला क्रमांक १ आहे. कशात तर निर्लज्जपणामध्ये, जगाच्या पाठीवर १८७ राष्ट्र आहेत त्या राष्ट्रात पारतंत्र्य असते, परदास्य, परवशता, गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा, लाज वाटत नाही. अशा बेशरम लोकांचा, निर्लज्ज लोकांचा १ अब्ज २३ कोटी लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान” असे संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

आम्हाला हे दोष निपटून काढून बाकी सगळ्या गोष्टी उत्कृष्ट असताना केवळ देहात प्राण नसेल पण निसर्ग देह चांगला आहे. चीनने तुम्हाला आम्हाला पालथे पाडण्यासाठी बदमाशी केली आहे ती म्हणजे कोरोना आहे. कोरोना स्त्री व पुरुष मनोवृत्तीच्या माणसांना होणारा रोग आहे. कोरोना हा थोंतांड असल्याचे संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

आमदार, खासदारांवर भिडेंची टीका

संभाजी भिडे यांनी राज्यकर्ते, आमदार, खासदारांवरही निशाणा साधला आहे. भल्या भल्याची बुद्धी निर्णय घेण्याच्या वेळी विकारवश होते तसेच आता असलेल्या राज्यकर्ते, आमदार, खासदारांचे मेंदू विकारवश झाले आहेत. दुर्गामाता दौडची परवानगी नाकारण्यात आली आहे. परवानगी नाकरुन पण आमचे आमदार खासदार राज्यकर्त्यांना खडसावत नाहीत. त्यांच्या अस्तित्वाचा काय फायदा असा प्रश्न संभाजी भिडे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर शस्त्र कधी आणि कोणासाठी काढायची हे कळेल – संजय राऊत


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -