घरमहाराष्ट्र​कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या १३०० जादा बसेस

​कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या १३०० जादा बसेस

Subscribe

कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या १ हजार ३०० जादा बसेस सोडण्यात येणार असून भाविकांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

श्री क्षेत्र पंढरपूर येथे ८ नोव्हेंबर रोजी भरणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटीने महाराष्ट्रातील विविध बसस्थानकावरून सुमारे १ हजार ३०० जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. येत्या ६ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही जादा वाहतूक करण्यात येणार आहे. याशिवाय आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे निर्देश स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाकडून देण्यात आले आहेत.

जादा बसेस सोडण्याचे नियोजन

कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रतील भाविकांची सोय करण्याच्या हेतूने दरवर्षीप्रमाणे एसटीने यंदा देखील १ हजार ३०० जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. या यात्रेला विशेषतः कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या विभागातून भाविक प्रवाशांची जास्त गर्दी होते. यासाठी या पाच विभागातून मुंबई ११०, रायगड १००, सिंधुदुर्ग ३०, ठाणे ३०, रत्नागिरी १२० विशेष जादा बसेस सोडण्यात येत आहेत. पंढरपूर येथे स्थानिक बसस्थानका बरोबरच चंद्रभागा नगर येथे विभागनिहाय तात्पुरत्या बसस्थानकाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गुगल – पेवरुन २ रुपयांचे पेमेंट केले आणि ४० हजार गमावले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -