घरदेश-विदेशपरीक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना पत्र

परीक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना पत्र

Subscribe

पत्राला विद्यार्थांनी लावला रक्ताचा थेंब

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडविण्याची सुचना केली. यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली असतानाच विविध विद्यार्थी संघटना परीक्षा रद्द करण्यावर ठाम आहेत. विद्यार्थी भारती संघटनेनेही परीक्षा रद्द करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या पत्रावर विद्यार्थांनी आपल्या रक्ताचे ठसे लावले आहेत.

परीक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना पत्र
पत्राला विद्यार्थांनी लावला रक्ताचा थेंब

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गहिरे बनत चालले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने यापूर्वी परिक्षेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रथम जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा रद्द करून मागील परीक्षांच्या आधारावर गुणदान करण्याची मागणी युजीसीकडे केली आहे. या मागणीवर नाराजी व्यक्त करत राज्यपालांनी राज्य सरकारला सूचना केल्या आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी नैराश्येत गेले आहेत. लॉक डाऊन नंतर अनेक विद्यार्थी त्यांच्या गावी गेले आहेत. यातच कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षेचा हट्ट धरण्यात येत असल्याबद्दल विद्यार्थी भारती संघटनेने याचा निषेध व्यक्त केला आहे. लाखो विद्यार्थांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे अशी मागणी संघटनेच्या राज्य अध्यक्ष मंजिरी धुरी यांनी केली आहे. या पत्रावर पदवी अभ्यासक्रमाची अंतिम सत्राची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रक्ताचे ठसे लावण्यात आले आहेत. सरकारने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यास परिक्षेवर बहिष्कार टाकण्याचा, इशाराही संघटनेने दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रेयसीला भेटण्यासाठी तो बनला मुलगी अन् झालं भलतंच


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -