घरताज्या घडामोडी'नाम' संस्थेची बदनामी करणे तनुश्रीला पडले महागात

‘नाम’ संस्थेची बदनामी करणे तनुश्रीला पडले महागात

Subscribe

नाम संस्थेने तनुश्री दत्ताविरोधात तब्बल २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

बाॅलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने ‘मीटू’ मोहिमेतंर्गत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. परंतु, नाना पाटेकर यांची सामाजिक संस्था नाम फाऊंडेशनविरोधात आरोप करू नये, अशी न्यायालयाने कानउघडणी केली आहे. त्यामुळे या संस्थेने तनुश्री दत्ताविरोधात तब्बल २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. काही महिन्यांपूर्वी तनुश्रीने पत्रकार परिषदांमध्ये नाम फाऊंडेशनविरोधातही टीकास्त्र सोडले होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तनुश्रीची बाजू मांडण्यासाठी तिचे वकील उपस्थित नव्हते. त्यामुळे नाना पाटेकर यांच्या संस्थेला काहीसा दिलासा देत असताना न्यायमूर्तींनी तनुश्रीला या संस्थेची बदनामी होईल, असे वादग्रस्त विधाने करू नये, असे निर्देश दिले आहेत. तसेच नाम फाऊंडेशनच्या प्रतिमेला बाधा पोहोचेल, अशी वक्तव्ये तनुश्रीने करू नये, असे न्यायालयाने बजावले आहे.

‘नाम’ संस्थेची अशी केली बदनामी

नाम फाऊंडेशने कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे. संस्थेने शेतकऱ्यांच्या नावाने परदेशातून कोट्यवधी रूपयांच्या देणग्या घेतल्या. मात्र, हा सर्व पैसा कुठे जातो? गरीब विधवांना वर्षातून एकदा साड्या वाटू फोटो काढायचे की यांचे काम झाले. कोल्हापूर पूरग्रस्तांना ५०० घरे देणार होते, त्याचे काय झाले? असाही प्रश्न तनुश्रीने उपस्थित केला होता.

- Advertisement -

तनुश्रीकडून ‘नाम’ संस्थेवर आरोप

‘नाम’ ही संस्था नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघांनी २०१५ साली सुरू केली होती. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ही संस्था काम करत आहे. जानेवारी २०२० मध्ये तनुश्रीने एक पत्रकार परिषद घेऊन या संस्थेवर आरोप केले होते. या आरोपांमुळे संस्थेची बरीच बदनामी झाल्याचे या संस्थेने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -