घरताज्या घडामोडीकेरसानेत वीज पडून तीन म्हशी ठार; दीड लाखांचे नुकसान

केरसानेत वीज पडून तीन म्हशी ठार; दीड लाखांचे नुकसान

Subscribe

बागलाण तालुक्यातील केरसाणे येथे शुक्रवारी रात्री वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या दरम्यान वीज पडून तीन म्हशी मृत झाल्या. येथील शेतकरी दशरथ आनंदा अहिरे यांच्या शेतातील गोठ्यात या म्हशी बांधलेल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच तलाठी साहेबराव अहिरे, विरगाव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. के. सावळे, पोलीस पाटील भाऊसाहेब मोरे, कोतवाल आंबा खैरनार, कैलास गांगुर्डे यांनी पंचनामा केला आहे. यात अहिरे यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. यावेळी केदा अहिरे, वसंत अहिरे, नानाजी अहिरे, लक्ष्मण अहिरे, दिलीप मोरे, संजू अहिरे, बाळू मोरे, तुकाराम अहिरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -