घरमहाराष्ट्रदोन भावांमधील जमिनीच्या वादात तिसर्‍याचा बळी

दोन भावांमधील जमिनीच्या वादात तिसर्‍याचा बळी

Subscribe

 कुरुळ गाव हादरले

दोन सख्ख्या भावांमध्ये असलेल्या जमिनीच्या वादातून भावाने भावाला मारण्याची सुपारी दिली, परंतु मारेकर्‍यांनी केलेल्या गोळीबारात तिसर्‍याचा बळी गेला. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. सागर पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. गौरव भगत गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी नीलेश वाघमारे याला ताब्यात घेतले आहे. गोळीबार करणारा भाऊ राजेंद्र मगर आणि त्याचा साथीदार फरार आहेत.

पोलिसांना या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी घटनास्थळी सापडली आहे. तालुक्यातील कुरुळ येथे रविवारी रात्री ही घटना घडली असून, संपूर्ण गाव या घटनेने हादरले आहे. कुरुळ गावात राहणारे जितेंद्र मगर व राजेंद्र मगर या दोन सख्ख्या भावांमध्ये जमिनीवरून वाद सुरू आहे. रविवारी रात्री जितेंद्र हा त्याच्या मित्रांसह कुरुळच्या दत्त टेकडीवरून रात्री 12 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून परतत असताना दबा धरून बसलेल्या राजेंद्र व त्याच्या साथीदारांनी पिस्तुलातून गोळीबार केला. यात जितेंद्र याचे दोन मित्र सागर पाटील व गौरव भगत हे गंभीर जखमी झाले.

- Advertisement -

टेकडीवरून पार्टी करून परतत असताना जितेंद्र हा त्याच्या बुलेट गाडीवर न बसता त्याचे दोन मित्र बुलेटवरून आले. तो दुसरी गाडी घेऊन आला. जितेंद्रची गाडी आली समजून या गाडीवर गोळीबार करण्यात आला आणि त्यात जितेंद्रचा मित्र सागरचा हकनाक बळी गेला.

दरम्यान, कुरुळ येथील गोळीबार घटनेनंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत. सरपंच अ‍ॅड. जनार्दन पाटील यांनी देखील राजेंद्र प्रकाश मगर याच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार एका निवदेनाद्वारे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -