घरमहाराष्ट्रमोदींना गायीचे इतके प्रेम का? - लक्ष्मण माने

मोदींना गायीचे इतके प्रेम का? – लक्ष्मण माने

Subscribe

'गोरक्षेच्या नावाखाली मोदी सरकार माणसंना मारत आहेत', अशी टीका लक्ष्मण माने त्यांनी यावेळी केली.

सामाजिक कार्यकर्ते आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांनी गोमांसाच्या मुद्यावरुन पंतप्रधान मोदींना धरुन थेट सवाल केला. कोल्हापुरमध्ये सुरु असलेल्या 

मोदींना कशाचा त्रास?

यावेळी माने म्हणाले की, ‘आम्हाला ज्या प्राण्याचे मटण आवडतो तो प्राणी आम्ही खातो. मग यामध्ये मोदींना कसला त्रास होतो?’ ‘गोरक्षेच्या नावाखाली मोदी सरकार माणसंना मारत आहेत’, अशी टीकाही त्यांनी यावेळी केलं. माने म्हणाले की, ‘भाजपला थोपवण्यासाठी मी आरपीआयच्या पुढाऱ्यांना भेटलो. मात्र, त्यावेळी ते तोंडावर बोट ठेवून गप्प होते. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी वंचितांसाठी पुढाकार घेऊन या बहुजन वंचित आघाडीची निर्मिती केली.’ दरम्यान, ‘यापुढे वंचित आघाडीचा झेंडा फडकवून आंबेडकरांना मुख्यमंत्री करण्याचा आपण निर्धार करुया’, असं आवाहनही माने यांनी उपस्थितींना केलं.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -