घरमुंबईभिवंडीत क्षुल्लक वादातून मित्रावरच केला जीवघेणा हल्ला

भिवंडीत क्षुल्लक वादातून मित्रावरच केला जीवघेणा हल्ला

Subscribe

मोबाईलवर चॅटिंग करताना क्षुल्लक वाद झाल्याने त्या वादातून मित्राने मित्राच्या डोक्यात लाकडी मार दांड्याने प्रहार करून जीवे मारण्याचा प्रयत्न कोला होता. या घटनेतील गंभीर जखमी मित्राचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.

मोबाईलवर चॅटिंग करताना क्षुल्लक वाद झाल्याने त्या वादातून मित्राने मित्राच्या डोक्यात लाकडी मार दांड्याने प्रहार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १७ जूनच्या रात्री वेहळे येथील दादोबा चौक येथे घडली होती. या घटनेतील गंभीर जखमी मित्राचा सोमवारी रुग्णालयात उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोशन बाळकृष्ण चव्हाण (वय १७) असे मृत झालेल्या मित्राचे नाव आहे.

काय घडले होते 

मृत रोशन याचे मित्र आशिष रमन थळे (वय १८) याच्याशी क्षुल्लक भांडण झाल्याने त्या वादातून आशिष याने रोशनच्या डोक्यात प्रहार केल्याने त्या हल्यात रोशन गंभीर जखमी झाला होता. त्याला बेशुद्धावस्थेत प्रथम ठाण्याच्या टायटन हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याच्या डोक्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र पाच दिवसांनी त्याची प्रकृती खालावल्याने त्याला अधिक उपचारासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याची मृत्यूशी झुंज सुरु असताना सोमवारी त्याची प्राणज्योत मालवली आहे. त्याचे आशिष रमन थळे या मित्राशी मोबाईल चॅटिंगवरून क्षुल्लक भांडण झाले होते. त्या रागातून आशिष याने लाकडी मारदांड्याने रोशन याच्या डोक्याच्या पाठीमागे जोरदार प्रहार केला होता. यात तो जागीच बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळल्याने त्याला आजुबाजूच्या नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या हल्ल्याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात आशिष थळे याच्या विरोधात भादंवि. कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. मात्र जीवे मारण्याची घटना झालेली असताना पोलिसांनी हल्लेखोराला पाठीशी घातल्याने त्याला दोनच दिवसात जामीन मिळाल्याने तो मोकाट फिरत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -