घरताज्या घडामोडीमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! भातसा धरण भरले, दोन दरवाजे उघडले 

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! भातसा धरण भरले, दोन दरवाजे उघडले 

Subscribe

शहापुर तालुक्यातील मुंबईला पाणी पुरवठा करणारे भातसा धरण शनिवारी ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटर उघडण्यात आले असून १२४६.२६ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील तानसा, मोडकसागर पाठोपाठ भातसा हे धरण देखील आता तुडुंब भरले आहे. शनिवारी ठिक दुपारी २.३० वाजता धरणाचे पाच पैकी धरण गेट क्रमांक १ आणि ५ हे दोन दरवाजे तातडीने उघडले असून भातसा नदी किनाऱ्या लगतच्या साजीवली, सरलांबे, तुते, सावरशेत, सापगाव, खुटघर, खुटाडी अशा अन्य गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे जलसंपदा विभागाच्या भातसा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी मााहिती देताना सांंगितले.

मुंबईला पाणी पुरवठा करण्याची महत्वाची जबाबदारी भातसा धरणावर आहे. प्रतिदिन २००० एमएलडी पाणी भातसा धरणातून मुंबई आणि ठाणे महानगराला दिले जाते. या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९ मीटर आहे. तसेच एकूण जलसंचय ९७६.१० दशलक्षघन मीटर आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चौरस किलोमीटर आहे.

- Advertisement -

भातसा धरणाला जोडलेला उजवा तिर कालवा ६७ किलोमीटर आहे. तर डावा कालवा ५० किलोमीटर आहे. भातसा धरणाच्या पाण्यावरती जलविद्युत केंद्राद्वारे १५ मेगावॅट एवढी वीजनिर्मिती केली जाते. शनिवारी भातसा धरण भरल्यानंतर जलपूजन करण्यात आले. यावेळी आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा जिल्हा परिषद सदस्य संजय निमसे, नगरसेवक विनोद भोईर, भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील, सहाय्यक अभियंता श्रेणी २चे शाम हंबीर सहाय्यक अभियंता गणेश कचरे आदी उपस्थित होते.


हेही वाचा – मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रस्ताव मंजूर 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -