घरमुंबईमुंबईत प्रत्येक इमारतीवर आता सीसीटीव्ही लागणार

मुंबईत प्रत्येक इमारतीवर आता सीसीटीव्ही लागणार

Subscribe

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

विनयभंग, बलात्कार, अत्याचार आणि महिलांवरील हल्ले अशा घडणार्‍या घटना रोखण्यासाठी आता मुंबईत सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. आता मुंबईत तब्बल पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक इमारतीवर सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत, असे देखील ते पुढे म्हणाले.

‘मुंबईत जेवढ्या इमारती आहेत. त्या इमारतींवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आम्ही विचार करत आहोत. त्यानुसार बांधकामाबाबत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा नियमात बदल देखील करणार आहोत. कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा विचार करत आहोत’, असल्याची माहिती देशमुखांनी दिली आहे.

- Advertisement -

वर्धा येथील हिंगणघाट येथील चौकात महाविद्यालयात शिक्षिका असलेल्या तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला गेला तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात एका ५० वर्षीय महिलेला गावातील बीअर बार चालकाने रात्री घरात घुसून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. या दोन्ही घटना घडल्याने महाराष्ट्र हादरला असताना पुन्हा एकदा अशीच एक घटना नवी मुंबईत घडली आहे.

तर मुंबई माटुंगा रोड रेल्वे पुलावरती एका आरोपीने मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या आरोपीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षितेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -