घरमुंबईकाँग्रेसची अर्णबला अटक करण्याची गृहमंत्र्यांकडे मागणी

काँग्रेसची अर्णबला अटक करण्याची गृहमंत्र्यांकडे मागणी

Subscribe

अर्णबचे कृत्य गोपनीयता भंग करणारे

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. ही अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली? असा सवाल करत हा देशद्रोहाचा प्रकार असून गोस्वामीना तात्काळ अटक करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

अनिल देशमुख यांनी यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे सावंत यांनी सांगितले. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अर्णब गोस्वामीवर कारवाई करण्याची मागणी केली. संरक्षणविषयक महत्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली, ही माहिती गोस्वामीला कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कशी काय मिळाली? त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का? अशी विचारणा सावंत यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केली.

- Advertisement -

अर्णब गोस्वामी यांचे कृत्य कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी. या कायद्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकारने अर्णब गोस्वामीना तात्काळ अटक करावी, अशी मागणी सावंत यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -