घरमुंबईधनगर आरक्षणाच्या मुद्दयावर पुन्हा गदारोळ

धनगर आरक्षणाच्या मुद्दयावर पुन्हा गदारोळ

Subscribe

मागील दोन दिवसांपासून धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून विधान परिषदेत गदारोळ सुरू झाल्याने विधानपरिषदेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाबाबत जोपर्यंत दिलगिरी व्यक्त करणार नाही, तोवर कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका सत्ताधारी पक्षाने घेतल्याने सलग दुसऱ्या दिवशी विधान परिषदेचे कामकाज ठप्प झाले. गुरूवारचे अनेक तास वाया जातानाच सभागृहाचे कामकाज मध्यांतरनंतर तहकूब झाले होते. दुसऱ्या दिवशीही सभागृहात याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंचे सत्ताधाऱ्यांवर आरोप

विधानपरिषदेत आजही प्रचंड गदारोळ झाला. आजही धनगर आरक्षणावरून गुरुवारी विरोधकांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत सभागृहाची माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी आजही लावून धरली. त्यामुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज सुरुवातीला दोनवेळा अर्ध्या तासासाठी आणि अखेरीस दिवसभरासाठी तहकुब करावे लागले.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच परिषदेत सत्ताधाऱ्यांकडून गोंधळ घातला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. विधान परिषदेत १६ मंत्र्यांचा भ्रष्टाचाराचा मुद्दा सभागृहात मांडला जाणार असल्याने या मुद्द्यांना बगल देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नाहक गोंधळ घातला अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली. ”सरकार भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे, त्यामुळे सरकारचा निषेध करतो,” असे मुंडे म्हणाले. ”विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाकडून एखाद्या समाजाचा आरक्षणाचा मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला आहे. यातूनच सरकारची नियत कळते,”अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – आम्हाला टॅक्सी मिळवून द्या; आमदारांची विधानसभेत मागणी


कालही सभागृहात धनगर आरक्षणावरून गदारोळ

कामकाजाच्या सुरुवातीला अर्धा तास चर्चा आणि त्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून अल्पकालीन चर्चा झाली. त्यानंतर नियमित कामकाज सुरु होताच प्रश्नोत्तराच्या तासात धनगर आरक्षणाचा तारांकित प्रश्न होता. मात्र, सत्ताधारी बाकांवरून काल धनगर आरक्षणाच्या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या भाई जगताप यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत सभागृहाची मागणी लावून धरली. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी झाली. त्यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला. धनगर समाज आणि मराठा समाज कुणाच्या बापाची जहागीर नाही. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे असे विधान केले होते. अखेर या गदारोळातच विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आले. तसेच २०१९-२० च्या पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मांडल्या. सभापतींनी सर्व कामकाज गदारोळातच रेटून नेले.

हे वर्तन सभागृहाला शोभणारे नव्हे

विधान परिषदेच्या सभागृहाची एक वेगळी प्रतिमा आहे. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांकडूनची अशी वर्तवणूक ही अशोभनीय आहे. अशा परिस्थितीत सभागृहाचे कामकाज सुरळीत चालणे शक्य दिसत नाही अशी नाराजी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. ”सभागृहातील गटनेत्यांनी बैठक येत्या सोमवारी सकाळी बोलवून कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी काय तोडगा काढता येईल हा प्रयत्न केला जाईल”, असे निंबाळकर म्हणाले.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -