घरमुंबईआंदोलने होऊनही जनतेचा भाजपावर विश्वास - मुख्यमंत्री

आंदोलने होऊनही जनतेचा भाजपावर विश्वास – मुख्यमंत्री

Subscribe

सांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळाले आहे. दोनही महापालिकेवर भाजपने झेंडा फडकावला आहे. आंदोलने होऊनही जनतेचा भाजपावर विश्वास असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटलेले आहे. त्यातच सरकार विरोधात वातावरण असताना देखील जळगाव, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकांचा कौल भाजपाच्या बाजूने लागला आहे. आजही जनतेचा आमच्यावर विश्वास असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाचा कोणताही परिणाम भाजपावर झाले नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

जनतेचा आजही भाजपावर आणि मोदींवर विश्वास

मोदींनी विकासाचे जे राजकारण सुरू केले त्यावर जनतेचा आजही विश्वास आहे आणि या निकालावरून पुन्हा एकदा त्यावर मोहोर उमटल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आणि भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री

जळगाव आणि सांगलीमिरजमध्ये नागरिकांनी भाजपावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे आज आंदोलने होत आहेत. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या देखील रास्त आहेत. हे सरकार त्या मागण्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. आरक्षण रोजगार, विकाससाचे प्रश्न सोडवण्यासाठी या विजयामुळे अजून पाठबळ मिळेल असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच सांगली मिरज कुपवाडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र लढले तरी जनतेने आम्हाला कौल दिल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे लोकांच्या मनात आजही भाजपाबद्दल विश्वास असल्याचे ते म्हणालेत.

मुंबई भाजपा कार्यालयात जल्लोष

सांगली आणि जळगाव महानगरपालिकेवर भाजपने झेंडा फडकावला आहे. भाजपच्या या विजयाचे स्वागत सांगली आणि जळगावमध्ये जल्लोषात केले जात आहेत. दरम्यान या विजयाचा जल्लोष मुंबईच्या भाजपा कार्यालयाबाहेर देखील करण्यात आल्याचे पहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -